प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे…
इंदापूर तालुक्यातील वकिलांची भारत सरकारच्या नोटरी पदी 40 पेक्षा जास्त अधिक वकिलांची भरती झाली आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. इंदापूर तालुक्यातील वकिलांचे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या नोटरी पदी निवडीबद्दल आनंद होत असल्याचे असे भाष्य राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील नोटरी पदी निवड झालेल्या 40 पेक्षा अधिक वकिलांचा सत्कार करण्यात आला.
मी ही लॉ चे शिक्षण घेतले आहे याचा मला अभिमान आहे. हा व्यवसाय चांगला आहे. लोकांना न्यायव्यवस्थेवर मोठा विश्वास आहे. नोटरी पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. तसेच न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता आपल्या माध्यमातून वाढावे अशी अपेक्षा यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी नोकरी झालेल्या वकिलांशी संवाद साधला व त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नोटरी पदी निवड झालेल्या सर्व वकील बांधवांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत ….