प्रतिनिधी :- पल्लवी चांदगुडे…
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :- 9373004029..
बारामती : पवार साहेबांचे नेहमी सांगणे असते की, तालुक्याच्या प्रत्येक गावात जाऊन तेथील स्थानिक अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत. तसेच त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्याच भूमिकेतून आपण स्वाभिमान यात्रा सुरू केली आहे, असे सांगत युगेंद्र पवार यांनी चौथ्या दिवशी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली.
आपल्या तालुक्यात अलीकडच्या काळात बेरोजगारी वाढली आहे, ती दूर करण्यासाठी आदरणीय पवार साहेब आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष कटिबध्द आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. या दौऱ्यात त्यांनी खामगळवाडी, कानडवाडी, मोराळवाडी, मोढवे, मुर्टी, जोगवाडी, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, मोरगाव, तरडोली या गावांना त्यांनी भेटी दिल्या.
यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीशमामा खोमणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष एस एन बापू जगताप, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत बोरकर, कार्याध्यक्ष गौरव जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ स्वाभिमान यात्रेत सहभागी झाले होते.
पवार साहेब व खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनात येत्या काळात आपल्या बारामतीत आयटी पार्क आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय गावातील स्थानिक प्रश्न व अडीअडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष कायम प्रयत्नशील राहील, आपल्या भागातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी शरयू फाउंडेशनने मोठे काम केले आहे, याचे समाधान आहे. वनगाईंपासून होणारा त्रास दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूयात, असा विश्वास त्यांनी दिला.
मुर्टी या गावाला शिक्षकांचे गाव म्हणून सर्वत्र ओळखले जाते, याचा आनंद वाटतो. बारामतीची स्वाभिमानी जनता हिच साहेबांची खरी ताकद आहे. आपण कायम सत्याची बाजू घेतली आहे आणि भविष्यात सुध्दा घेत राहू.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारे आणि कर्जमाफी करणारे कृषीमंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांची देशात ओळख आहे, असेही त्यांनी नमूद केले.